नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16/09/2024 असी आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Sunday, January 30, 2022


जगाला सत्य व अहिंसेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


 ❱❱ *मिशन नवोदय 2022* ❰❰

*खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा*

*📘📚🇮🇳 उतारा 6 🇮🇳📚*
        *महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे नाव मोहनदास गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ला गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. लहानपणी मोहनदास अभ्यासात साधारण होते, पण त्यांच्या मनात आई वडिल व गुरूजनांविषयी अतोनात आदर होता. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू लागले.*
*इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात आले. काही दिवस वकिली म्हणून काम केल्यावर एका खटल्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिका येथे जावे लागले. तेथे अनेक भारतीय व्यापारी आणि मजूर रहात होते. त्यांच्यावर फारच अन्याय होत असत. भारतीयांच्या हक्कासाठी अहिंसक लढा दिला. शेवटी त्याचा जय झाला.*
*गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा येथे सुध्दा जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली. भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून बाहेर करण्यासाठी सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करण्याचा निर्धार केला. देशासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. गांधींचे संपूर्ण जीवन त्यागाचे होते. म्हणून त्यांना लोक 'बापू' म्हणत. तसेच त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.*
*इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अहिंसा, असहकार, स्वदेशीचा वापर या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. 'चले जाव चळवळ, दांडी यात्रा अशा विधायक मार्गाचा वापर करून भारताला १५ आगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.*

========================
 
 प्रश्न1)महात्मा गांधीजी यांचा जन्म कोठे झाला ?
A) गुजरात
B)पोरबंदर
C)इंग्लंड
D) विलायत
प्रश्न 2) खालील पैकी कोणती पदवी गांधीजींशी संबंधित नाही ?
A)बापू
B)महर्षी
C)महात्मा
D) राष्ट्पिता
प्रश्न 3)खालीलकी गांधीजी बाबत चुकीचे विधान कोणते
A) लहानपणी ते अभ्यासात साधारण होते.
B) त्यांना आई वडील , गुरुजनांबद्दल आदर होता. 
C)पुढच्या शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले.
D) सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.
प्रश्न 4) इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी खालील पैकी कोणत्या सूत्राचा गांधींनी वापर केला नाही ?
A)अहिंसा
B)स्वदेशी
C) जुलूम
D) असहकार
प्रश्न 5)मनाशी निश्चय करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उताऱ्यात आला आहे?
A) मुक्त करणे
B)अन्याय करणे
C)लढा देणे
D)निर्धार करणे
  

  *━━━━प्रश्न निर्मिती━━━━**
  *विजय रामरतन गिरी*
       *जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*
     📞 *8805577729* 📞
     ════ 🎯🎯🎯════

No comments:

Post a Comment