नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Tuesday, December 6, 2022

❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 6/12/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 15 〇 

════════════════

 मृदा हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. आरोग्यदायक मृदा हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.

शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल!


1】अन्नधान्याच्या 90 % गरजा पूर्ण होतात ....

A ) कारखान्यातुन      B)  दुकानातून     C) विदेशातुन      D) शेतीतून

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2】पृथ्वीचा किती भाग विविध जीवानी व्यापला आहे ?

  A )  2/4     B)1/2 

   C) 1/4   D)3/4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3】 मृदे मध्ये कोणती क्षमता नाही ?

 A )पाणी साठवण्याची      

B) पाणी अड़वण्याची 

C)पाणी वाचवण्याची 

D)पाणी शुद्ध करण्याची 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4】मृदा म्हणजे ....

 A ) शेती      B)  मती    C)  माती    D) नरम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5】माती पाया आहे ?

  A )  पीके      B) शेती     C) पीके व शेती  D) पाणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6】माती शिवाय शेती संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही कारण 

  A ) पृथ्वीवर माति कमी आहे       B)   पृथ्वीवर पाणी कमी आहे     C)  पृथ्वीवरील जनतेचे  पोट भरण्याची कूवत त्यात नाही 

D)मातीशिवाय शेती होऊ शकत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7】जमिनिची धूप  पुढीलपैकी कशाने होत नाही ..

  A ) जंगलतोड      B)ज़ोराचा पाऊस   C) गारा      D) अनियंत्रित चराई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8】उताऱ्यात कष्टकऱ्यांची माउली कुणाला उद्देशीलेले आहे ? 

  A ) शेतकरी      B) माति    C) खते      D) अन्न

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9】कमतरता असणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ? 

  A ) अभाव      B )मृदा       C) जैविक     D) वारेमाप

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10】रासायनिक खतांचा वारेमाप वापर येथे वारेमाप म्हणजे ...

  A ) कमी प्रमाणात

  B)   मोठ्या प्रमाणात   

  C)योग्य प्रमाणात

 D) वाऱ्या सारखा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

11】 पिकांची वाढ व गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे..

A) जमिनिच्या सुपिकतेमुळे

B) जमिनिची धूप होत आहे त्यामुळे

C) शेतकऱ्यांच्या आळशी वृत्तिमुळे

D) साधनाचा अभाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

12】सुपिक च्या विपरीत अर्थाचा शब्द

A)अपिक B) चांगल पिक

C) नापिक D) अतिपिक

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

No comments:

Post a Comment