नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Monday, March 6, 2023

 *👉महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया.*

 *सामान्य ज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे*


(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.


(2)  महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


(3)  महाराष्ट्राची राजधानी - मुंबई


(4)  उपराजधानी - नागपूर.


(5)  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔


(6) महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.


(7) महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


(8) महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


(9) महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.


(10) विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


(11) विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


(12) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


(13) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


(14) महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


(15) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


(16) महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


(17) महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


(18) महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


(19) महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


(20) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


(21) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


(22) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


(23) भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


(24) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


(25) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


(26) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


(27)  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


(28) पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


(29) गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


(30) प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


*🗒️स्त्रोत :- गूगल

No comments:

Post a Comment