यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
B.Ed. प्रवेश प्रक्रिया 2023/25 सुरु..
खालील लिंक ला क्लिक करून फॉर्म भरता येईल
केंद्रप्रमुख भरती
महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था ,
विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त शैक्षणिक संस्थांची माहितीचे संकलन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
1) N.C.E.R.T.
( National Council of Educational Research and Training)
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था
स्थापना - 01 सप्टेंबर 1961
मुख्यालय : दिल्ली.
अध्यक्ष. : दिनेश प्रसाद साकलानी
N.C.E.R.T STRUCTURE (संरचना)
1) सर्वसाधारण परिषद (शासन)
अध्यक्ष : शिक्षण मंत्री
सदस्य : विद्यापीठाचे कुलगुरु यूजीसी प्रमुख,
मानव संसाधन विकास मंत्रालय.
2) कार्यकारी समिती (प्रशासन)
अध्यक्ष : संसाधन विकास मंत्री
उपाध्यक्ष : संसाधन विकास राज्यमंत्री
समन्वयक - N.C.E.R.T चे सचिव
1) अर्थ समिती 2) स्थापना समिती 3) कार्यकारी समिती.
N.C.E.R.T. ची उद्दिष्टे :
1) शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे.
2) शिक्षणाच्या सर्व विद्या शाखा मध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे.
3) शिक्षकांना सेवा पूर्व व सेवा अंतर्गत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
4) ज्ञानाचा प्रसार करणे व शैक्षणिक समस्यांची सोडवणूक करणे.
5) केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणामध्ये समन्वय ठेवणे.
6) शिक्षण विषयक नवीन विचार प्रवाहांचा शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांना परिचय करून देणे.
7) राज्यातील शिक्षण खाते व शिक्षण संस्था यांना शैक्षणिक समस्या विषयी मार्गदर्शन करणे.
N.C.E.R.T. अंतर्गत कार्य करणाऱ्या घटक संस्था
1) राष्ट्रीय शिक्षण संस्था (N.I.E.)
2) केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था.
3) क्षेत्रीय शिक्षण शास्त्र संस्था
4) पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था, भोपाळ.
N.C.E.R.T. चे प्रमुख कार्य :
1) इंग्रजी व हिंदी भाषेतून पहिली ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणे.
2) वेळोवेळी शैक्षणिक धोरणांना अनुसरून अभ्यासक्रम आराखडा तयार करणे.
3) संशोधनासाठी शिक्षकांना प्रोत्साहन व अनुदान उपलब्ध करून देणे तसेच नव उपक्रमांना प्रोत्साहन देणे.
4) राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे (NTSE) आयोजन करणे व गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.
5) केंद्र व राज्य सरकार यांच्यामध्ये शैक्षणिक धोरणांचा समन्वय प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. तसेच विविध विद्यापीठे, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, केंद्रीय नवोदय विद्यालय यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे कार्य एनसीईआरटी ही संस्था करते.
🎯🎯मिशन केन्द्रप्रमुख🎯🎯
*👉केंद्र प्रमुख विभागीय परीक्षेच्या नवीन 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी👇👇*
केंद्रप्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी. वेळ 2 तास असणार आहे.
पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.
पेपर क्रमांक एकमध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकावर 100 वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत.
केंद्र प्रमुख परीक्षेच्या दोन्ही पेपरचे नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.
पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता *
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.
👉👉पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नव विचार प्रवाह *
1.)भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी, कायदे, नियम इत्यादी - 10 गुण
2). शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, शैक्षणिक संस्था, कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.) माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4) अभ्यासक्रम व मुल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती, शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 )माहितीचे विश्लेषण, मुल्यमापन, सहसंबंध इत्यादी - 20 गुण शैक्षणिक
6 )विषय ज्ञान, सामान्यज्ञान, इंग्रजी विषयज्ञान इत्यादी - 15 गुण
7) संप्रेषण कौशल्य - 15 गुण
🌸vijaygiri143.blogspot.com🌸
महाराष्ट्र राज्य विशेष माहिती प्रश्न मंजुषा भाग - 2.
(३१) महाराष्ट्र राज्याचे किती प्रशासकीय विभाग पाडले आहेत ?
उत्तर--- सहा
(३२) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?
उत्तर --- मुंबई शहर
(३३) महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
उत्तर --- मराठी
(३४) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
उत्तर--- यशवंतराव चव्हाण
(३५) महाराष्ट्र राज्याचा राज्यफूल कोणता ?
उत्तर--- ताम्हन / मोठा बोंडारा
(३६) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
उत्तर--- गंगापूर (नाशिक)
(३७) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर--- सावित्रीबाई फुले
(३८) महाराष्ट्र हे भारत देशातील .... आहे.
उत्तर --- राज्य .
(३९) महाराष्ट्राच्या समुद्र किना-याची लांबी किती कि. मी. आहे ?
उत्तर --- ७२० कि. मी.
(४०) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर -- रत्नागिरी
(४१) छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे ?
उत्तर -- रायगड
(४२) अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- पालघर
(४३) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
उत्तर -- त्र्यंबकेश्वर ( नाशिक)
(४४) भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे ?
उत्तर -- भीमाशंकर
(४५) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नागपूर
(४६) अजिंठा, वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तर -- औरंगाबाद
(४७) रायगड जिल्ह्यांचे पूर्वीचे नाव काय होते ?
उत्तर -- कुलाबा
(४८) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- लाकडी खेळणी.
(४९) जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- केळी
(५०) तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- नंदुरबार
(५१) नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- द्राक्षे
(५२) न्हावाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(५३) आंबोली हे पर्यटनस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सिंधुदुर्ग
(५४) तोरणमाळ येथील तलावाचे नाव काय ?
उत्तर -- यशवंत तलाव
(५५) नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे ?
उत्तर -- सातपुडा
(५६) प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- सातारा
(५७) मूरूड - जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर -- रायगड
(५८) जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे ?
उत्तर -- जलदुर्ग
(५९) दौलताबाद किल्ल्याचे पुर्वीचे नाव काय ?
उत्तर -- देवगिरी
(६०) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तर -- राहाता
*👉महाराष्ट्र राज्याची थोडक्यात माहिती घेऊया.*
*सामान्य ज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे*
(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (𝟏𝟔𝟒𝟔 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.
(2) महाराष्ट्राला 𝟕𝟐𝟎 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
(3) महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
(4) उपराजधानी - नागपूर.
(5) महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 𝟑𝟔
(6) महाराष्ट्राने भारताचा 𝟗.𝟕 टक्के भाग व्यापलेला आहे.
(7) महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.
(8) महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.
(9) महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.
(10) विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.
(11) विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.
(12) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.
(13) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.
(14) महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
(15) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.
(16) महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे
(17) महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
(18) महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
(19) महाराष्ट्रातील 𝟏𝟎𝟎 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.
(20) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.
(21) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.
(22) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.
(23) भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.
(24) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.
(25) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.
(26) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.
(27) महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.
(28) पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.
(29) गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.
(30) प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
*🗒️स्त्रोत :- गूगल
❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰
दिनांक - 6/12/2022
▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
〇 उतारा 15 〇
════════════════
मृदा हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. आरोग्यदायक मृदा हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.
शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.
रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल!
1】अन्नधान्याच्या 90 % गरजा पूर्ण होतात ....
A ) कारखान्यातुन B) दुकानातून C) विदेशातुन D) शेतीतून
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2】पृथ्वीचा किती भाग विविध जीवानी व्यापला आहे ?
A ) 2/4 B)1/2
C) 1/4 D)3/4
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3】 मृदे मध्ये कोणती क्षमता नाही ?
A )पाणी साठवण्याची
B) पाणी अड़वण्याची
C)पाणी वाचवण्याची
D)पाणी शुद्ध करण्याची
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4】मृदा म्हणजे ....
A ) शेती B) मती C) माती D) नरम
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5】माती पाया आहे ?
A ) पीके B) शेती C) पीके व शेती D) पाणी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6】माती शिवाय शेती संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही कारण
A ) पृथ्वीवर माति कमी आहे B) पृथ्वीवर पाणी कमी आहे C) पृथ्वीवरील जनतेचे पोट भरण्याची कूवत त्यात नाही
D)मातीशिवाय शेती होऊ शकत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7】जमिनिची धूप पुढीलपैकी कशाने होत नाही ..
A ) जंगलतोड B)ज़ोराचा पाऊस C) गारा D) अनियंत्रित चराई
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8】उताऱ्यात कष्टकऱ्यांची माउली कुणाला उद्देशीलेले आहे ?
A ) शेतकरी B) माति C) खते D) अन्न
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9】कमतरता असणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?
A ) अभाव B )मृदा C) जैविक D) वारेमाप
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10】रासायनिक खतांचा वारेमाप वापर येथे वारेमाप म्हणजे ...
A ) कमी प्रमाणात
B) मोठ्या प्रमाणात
C)योग्य प्रमाणात
D) वाऱ्या सारखा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11】 पिकांची वाढ व गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे..
A) जमिनिच्या सुपिकतेमुळे
B) जमिनिची धूप होत आहे त्यामुळे
C) शेतकऱ्यांच्या आळशी वृत्तिमुळे
D) साधनाचा अभाव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
12】सुपिक च्या विपरीत अर्थाचा शब्द
A)अपिक B) चांगल पिक
C) नापिक D) अतिपिक
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚