नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

आपणांस कळविण्यात येते की दिनांक 16/07/2024 पासून वर्ग सहावीच्या प्रवेश करिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29/09/2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा दिनांक 18/01/2025 रोजी शनिवारला होणार आहे i

Tuesday, March 30, 2021

 📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚🎯📚

    *तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची*

        *विषय - भाषा*

*घटक - कार्यात्मक व्याकरण*

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे व्याकरण. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या भागाला 20% इतका भारांश आहे. 

  🔹शुद्ध व अशुद्ध शब्द🔹

*🎯लक्षात ठेवा :*

 व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार ,ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठी शुध्दलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासू या .

*१) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो , त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा .*

उदा ., कांदा , भिंत , सुगंध , दिंडी , संबंध , धांदल इत्यादी .

*२) एकाक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ 'स्वर दीर्घ लिहावेत .*

उदा ., मी , ती , तू , धू , जू इत्यादी

*३) सामान्यपणे , कोणत्याही शब्दातील शेवटचा  ' इ ' व ' उ ' हे सर्व दीर्घ लिहावेत .

उदा ., कवी ,रवी , विद्यार्थी ,गुरु ,अणू ,पशू इत्यादी .

मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले , तर त्यांतील शेवटचा  ' इ ' किंवा ' उ ' सर्वर ऱ्हस्व लिहावा .

उदा ., कविचरित्र ,विद्यार्थिभांडार .गुरुकृपा इत्यादी .

*४) अकारान्त शब्दातील उपांत्य ( शेवटून दुसरे अक्षर ) ' इकार ' व ' उकार ' दीर्घ लिहावेत.*

उदा ., वीट , मीठ , खीर ,दूध , तूप ,नवनीत ,जमीन  इत्यादी .

*५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील ' इकार ' व 'उकार ' बहुधा ऱ्हस्व लिहावेत .*

उदा ., गरिबी , पाहुणा ,किती ,दिवा , महिना , नमुना ,बहिणी , वकिली इत्यादी .

*वरील घटकावरील तसेच नवोदय व शिष्यवृत्ती  ऑनलाईन टेस्ट सोडवा व  सराव करण्यासाठी खालील ब्लॉग ला अवश्य भेट द्या*

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

*http://vijaygiri143.blogspot.com*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📣ब्रेकिंग न्युज*

*शिष्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा बदल*

*👉परीक्षा 25 एप्रिल 2021 ऐवजी 23 मे 2021 रोजी होणार.*

*👉 फॉर्म भरण्यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत मुदतवाढ*

➿➿➿➿➿➿➿➿➿➿

*📝संकलन - विजय रा गिरी (स शी)* 

*जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*

  8805577729

➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖🎯➖

Sunday, March 28, 2021

     🔥मिशन नवोदय 🔥


#@ उतारा 5 @#
# वरील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा.
होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला असतो. होळी हा एक महत्वाचा सण आहे. होळीला  ' शिमगा ' असेही म्हणतात. होळीचा सण दोन  दिवस साजरा करतात. होळीच्या दिवशी ठरलेली जाग सारवून त्या ठिकाणी  एक मोठा खड्डा खणतात. मध्यभागी झाडाची फांदी उभी करतात. त्याच्या आजूबाजूला लाकडे व गोव-या रचून होळी तयार करतात. संध्याकाळी होळी पेटवून तिची पूजा करतात. तिला नैवेद्य अर्पण करतात.    होळी म्हणजे हुताशनी देवी आहे असे मानतात. ती होळी बरोबर सर्व वाईटांचा जाळून नाश करते असा समज आहे. वर्गणी काढून सार्वजनिक होळीही अनेक ठिकाणी साजरी करतात.होळीच्या दुसर्‍या दिवसाला धुलीवंदन म्हणतात.त्या दिवशी रंग उडवून खेळ खेळतात.एकमेकांच्या अंगावर रंग उडवायला खूप मजा वाटते. दोन्ही दिवस गोडाचे जेवण करतात व आनंदाने होळीचा सण साजरा करतात.

प्रश्न 1 उताऱ्यात उल्लेखलेल्या सणासाठी खालीलपैकी कोणता शब्द  आलेला नाही 

A )  शिमगा   B) हुताशनी देवी  c)    होळी   D ) फाल्गुन 

प्रश्न 2 - होळी हा सण कोणत्या महिन्यात साजरा करतात

A) माघ  B ) चैत्र  c) फाल्गुन  D ) अश्विन 

प्रश्न 3 होळी सणाचा मुख्य उद्देश आहे ? 

A ) हुताशनी देवीला प्रसन्न करणे 

B) वाईट गुणांचे दहन करणे 

C) लोकवर्गणी जमा करणे

D) गोवऱ्या व लाकडे जाळणे

प्रश्न 4 यावर्षी सर्वजनांना होळी कशी साजरी करावी लागणार ? 

A) दरवर्षी पेक्षा अधिक जोशाने 

B) सामूहिक पद्धतीने 

C) आपापल्या घरातच राहून 

D) ऑनलाईन पद्धतीने

प्रश्न 5 होळीच्या दुसऱ्या दिवसाला म्हणतात ? 

A) तान्हा पोळा 

B ) शिमगा 

C) फाल्गुना 

D) धुलीवंदन

उत्तरे - 

1)   D      2)   C     3)   B     4 ) C     5)  D

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

=======================================

Monday, March 22, 2021

               ▌   *✺दिनविशेष✺*       ▌

                   *🔰22 मार्च*🔰 

            *📕 जागतिक जल दिन🕳*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*♋जागतिक जल दिन- २२ मार्च*♋

*पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही.परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !*

*♋मूळ संकल्पना व सुरुवात*

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.

*♋अधिक माहिती*

तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-

१) पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.

२) पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.

३)जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.

पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

*स्वत: ला खरोखरी किती पाण्याची* *गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*                                       

Saturday, March 20, 2021


 🇼‌🇴‌🇷‌🇱‌🇩‌ 🇸‌🇵‌🇦‌🇷‌🇷‌🇴‌🇼‌ 🇩‌🇦‌🇾‌

*◆🌍 जागतिक चिमणी दिवस 🌍◆*

●══════════════════●

*मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस २० मार्च २०१० रोजी पाळला गेला. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. या पार्श्वभूमीवर चिमण्यांचे संरक्षणआणि त्याविषयीच्या जागृतीसाठी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला.*

*संकल्प करूया , चिवचिवाट वाढऊया*

http://vijaygiri143.blogspot.com

🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

Monday, March 15, 2021

जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या तारखेत बदल Changes in the date of Jawahar Navodaya entrance examination

शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी जेएनव्ही मधील सहावीच्या प्रवेशासाठी जेएनव्ही निवड चाचणी शनिवारी, 10 एप्रिल 2021 रोजी नियोजित तारीख काही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मिझोरम वगळता इतर सर्व राज्यांमध्ये आता 16 मे 2021 रोजी निश्चित करण्यात आली आहे. 

मेघालय आणि नागालँडचे १ जून २०२१ रोजी शनिवारी हि परीक्षा होणार आहे.सर्व विद्यार्थी पालक,शिक्षक यांनी याची नोंद घ्यावी.Navodaya exam will be held on 16th May 2021 instead of 10th April 2021


Sunday, March 14, 2021

 स्वाध्याय उपक्रमात सहभागी कसे व्हाल 

Whatsapp स्वाध्याय उपक्रम हा इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यासाठी आहे.

 # उपक्रमात सहभागी होण्यासाठी काही पायऱ्या 

=》 प्रथम वरील व्हाटस अप लोगोवर टिचकी मारा 

=》 त्यानंतर आपण नवीन विंडो मध्ये ConveGenius whatsapp DP असलेल्या मेसेज box मध्ये  अगोदरच ' नमस्कार '     असे लिहिलेले दिसेल याठिकाणी आपल्याला फक्त send च्या चिन्हावर टिचकी मारायची आहे

=》माध्यम निवडा  =》मराठीसाठी 1 , सेमिसाठी 2 , उर्दूसाठी 3  योग्य पर्याय निवडून पाठवा   

=》त्यानंतर मला सर्व अटी व शर्ती मंजूर आहेत साठी 1 , मला सर्व अटी व शर्ती मंजूर नाहीत 2 पाठवा 

=》त्यानंतर तुम्ही शिकत आसेलेल्या शाळेचा UDISE क्रमांक नोंदवायचा  

=》त्यानंतर इयत्ता निवडा

=》त्यानंतर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव लिहा  

=》स्वाध्याय सुरु करण्यासाठी 1 निवडा   

=》त्यानंतर आपल्याला एक एक करून दहा प्रश्न विचरले जातील   

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》त्यानंतर फक्त आपले उत्तर म्हणून पर्याय क्रमांक इंग्रजीतच ( अंकात )पाठवा पूर्ण उत्तर टाईप करू नये 

=》शेवटी उत्तराची pdf पहावी

Monday, March 8, 2021



🏃‍♀️ *महिला दिन विशेष सामान्यज्ञान*🏃‍♀️ 

⬅️➡️⬅️➡️⬅️➡️⬅️➡️⬅️➡️⬅️

*१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?*

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

*२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

*३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?*

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

*४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?*

उत्तर -- लता मंगेशकर 

*५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?*

उत्तर -- इंदिरा गांधी 

*६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?*

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

*७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?*

उत्तर -- कल्पना चावला

*८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

उत्तर -- इंदिरा गांधी 

*९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

उत्तर -- बचेंद्री पाल 

*१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?*

उत्तर -- मीरा कुमार 

*११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?*

उत्तर -- किरण बेदी

*१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?*

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

*१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?*

उत्तर -- प्रेमा माथूर

*१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- पी. टी. उषा 

*१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?*

उत्तर -- नेमबाजी 

*१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?*

उत्तर -- सुश्मिता सेन 

*१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?*

उत्तर -- मदर तेरेसा

*१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- बॅडमिंटन

*१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?*

उत्तर -- लाॅन टेनिस 

*२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*

उत्तर -- बाॅक्सिंग


*२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- तिरंदाजी 

*२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- जलतरण

*२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- बुध्दिबळ 

*२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

*२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?*

उत्तर -- अनुताई वाघ 

*२६) विश्वसुंदरी किताब मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?*

उत्तर -- सुश्मिता सेन 

*२७) ' सरिता गायकवाड ' कोणात्या खेळाशी संबंधित आहेत ?*

उत्तर -- धावपटू 

*संकलक :- विजय गिरी* 

=============================